मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

गुरुवार, 22 जनवरी 2009

Table of Nine -- देखिए यह वीडियो

नौ के पहाडे की लम्बी कहानी हमने जो सीखी सुनो, जरा संभल के करना हिसाब प्यारों, मिलेंगे नौ के नौ.. Klik here
अर्थात्
नवाच्या पाढ्याची गंमत जंमत
अर्थात्
अन्य भारतीय भाषाओं में भी
देखिए यह वीडियो
और समझिये कितना सरल है
जी हाँ गणित।

शुक्रवार, 16 जनवरी 2009

पांढरी फुले -05

पांढरी फुले
published in Lokmat on 31 jan 2009
लहानपणी आम्ही भेंडयांसारखाच पण थोडा वेगळा एक खेळ खेळत असू. दोन पार्ट्या. त्यांनी एकापाठोपाठ एक धडाधड फुलांची नांव सांगायची. जी पार्टी अं, अं, करेल म्हणजे पटकन नांव सांगू शकणार नाही, त्या पार्टीवर भेंडी. खेळ लवकर संपवायचा नसेल तर नांव आठवण्यासाठी घड्याळ लावून 1 किंवा २ मिनिट वेळ द्यायचा. याच खेळाचा थोडा वेगळा प्रकार असा कि दोन्ही गटांनी एका ठरावित ठेळेत पाटीवर नांवे लिहून काढायची- त्यांत पुनः रंग पण ठरवून दिले जायचे- कधी फक्त लाल फुलं, कधी पांढरी फुलं - कधी वासाची तर कधी बिनवासाची फुलं, वगैरे. या खेळामुळे आमच सृष्टिज्ञान खूपच वाढल आणी सृष्टिप्रेम पण.
असा खूप फुलांचा विचार केला की एक गोष्ट पटकन लक्षात येते. साधारणपणे भारतीय फुलं पांढरी आणी सुवासिक असतात तर रंगीत फुल कमी वासाची. विशेषतः विदेशातून आपल्याकडे आणून लावलेली खूपशी रंगीत फुल बिनवासाची आहेत पण वासाची कमतरता रंगानी भरून काढली आहे - मग एकाच जातीच फूल आपल्याला विविध रंगात पहायला मिळत.
पांढ-या फुलांच आणी पावसाच पण नात असतं. बहुतेक सर्व पांढरी फुल पावसाळ्यांत फुलू लागतात. कारण पण उघड आहे. पाण्यामुळेच सुवास निर्माण होतो. तापलेल्या मातीवर पाऊस पडल्याने जो मातीचा गंध दरवळतो त्याच्या पुढे बाकी सर्व गंध फिक्के पडतात अस मला वाटत.
तरी पण फुलांच्या वासाच महत्व कमी होत नाही. वासाची पांढरी फुलं म्हटल की हटकून पहिल नांव तोंडावर येत ते जाई आणी जुईचं. जुईच फूल लहानखोर - नाजुक, तर जाईच थोडस मोठ. मांडवावर हे वेल चढवून ठेवले तर जवळ जवळ वर्षभर फुलं येत रहातात. त्याही पेक्षा गंमत म्हणजे बागेत झोपाळा बांधायचा, शेजारी हे वेल दोन्ही बाजूला लावायचे आणी झोपाळयाच्या कमानीवरच चढवायचे. किंवा दोन तीन मजली घर असेल, गच्ची असेल, तिथे गच्चीवर वेल चढवायचे. जुईच्याच वासाच आणखीन एक थोड मोठ फूल म्हणजे सायली. कोणी तिला चमेली पण म्हणतात.
ही सगळी फुले पांढरीच! पण शुभ्र पांढर फूल बघायच असेल तर ते म्हणजे कुंदाच फूल. म्हणूनच पांढ-या स्वच्छ दातांना कुंदकळ्यांची उपमा देतात. 'या कुन्देन्दु तुषारहारधवला' सारख्या सरस्वतीच्या श्लोकांत पण धवलपणासाठी कुंदाची उपमा दिली आहे. पण कुंदाचा वास अगदी मंद, जवळून घेतला तरच येतो.
पांच पाकळयांचं चादणीच्या आकाराच एक फूल असतं, - बहुतेक मंदिरांमधे देवाचे हार करण्यासाठी वापरतात. लहानपणापासून माझ्या मनांत चांदणीच्या फुलाच्या मंद वासाच आणी मंदिराच गणित इतक पक्क जमलय की त्या फुलाच्या वासाबरोबरच मला जबलपूरच्या माझ्या शाळेच्या वाटेवरचं कृष्णाचं मंदिर डोळ्यासमोर दिसू लागत.
वासाने घर भरून टाकणार फूल म्हणजे मोगरा. हा पुन्हा कधी एकेरी असेल, तर कधी खूप गच्च पाकळयांचा. मोग-याच्या एका जातीच नाव तर हजारी मोगरा आहे- कारण तो गुच्छा-गुच्छांनी फुलतो.
पांढ-या फुलांवर वेगवेगळया रंगांच्या छटा- आल्या की त्यांचे रंग वेगवेगळे वाटतात. प्रत्येक छटेच आकर्षण वेगळच. पारिजातकाच्या फुलाला केशरी देठ असतं. अत्यंत मधुर वासाच हे फूल भल्या पहाटे दरवळायला सुरवात होते ते सूर्योदयापर्यंत. ज्यांना पहाटे उठता येत नसेल त्यांना यांचा सुगंध कधीच कळणार नाही. आमच्या घरांत शेजारी शेजारीच रातराणी आणी पारिजातकाची झाडं आहेत. रातराणी दरवळण्याची वेळ रात्री आठपासून दोन-तीन पर्यंत - पहाट झाली की मात्र पारिजातकाचं राज्य सुरू होतं.
बुचाचे फूलही असेच, सुंदर, लांबपर्यंत वास दरवळणारे. याला लांब देठ असल्याने बिन दो-यानेच छान गजरा करता येतो. किंवा उथळ बशीत पाणी ठेऊन त्यांत ही फुलं गोलाकार सजवून ठेवली तर दोन दोन दिवस छान वास देत रहातात. याचे झाड खूपखूप उंच असते. आपण फक्त खाली पडलेली फुलेच वेचू शकतो. याची इतर नांवं आहेत – गगनजाई (मराठी), गगनमल्लिका (कन्नड) आकाशनील (हिंदी, बंगाली).
सहा-सात पाकळ्यांचं टपोरं अनंताच फूल कोकणांत खूपच प्रिय. वास तर इतका छान की याला हिंदीत गंधराज आणी ओरिया-बंगालीत सुगंधराजच म्हणतात.
छोट्या बटणाच्या आकाराचं बकुळीचं फूल—याचा छान सडा दिवसभर पडत असतो. लांबपर्यंत याचा मंद सुगंध जातो. आम्ही ही पुलं पुस्तकांत ठेऊन देत असू कारण सुकली तरी या पुलांचा वास कित्येक वर्ष टिकून रहातो.
खूप जणांना लक्षांत येत नाही, पण चैत्रातील पहाटेच्या मंद झुळुकी बरोबर कडुलिंबाच्या फुलांचा वास दरवळतो तो अप्रतिमच. असाच आंब्याच्या मोहोराचा वास, आणी हो, बाभळीचीही एक अशी जात असते जिला छान वासाची बारीक पांढरी फुले येतात.
या यादीत अजूनही कितीतरी फुलांची नांवं राहिली आहेत, उदा. चाफा, कमळ, वगैरे. पाहू या तर, तुमच्या पैकी कोणकोण मला फुलांची माहिती कळवू शकेल.
--------------------------------------------------------























गुरुवार, 15 जनवरी 2009

घोडा क्यों अडा ? -04

घोडा क्यों अडा ?
-- लीना मेहेंदळे
leenameh@yahoo.com
yet to keep on website
published in Lokmat on Saturday 24 jan 2009
अकबर बिरबलाच्या गोष्टींमधे ही एक छानशी गोष्ट आहे. अकबराने आपल्या दरबा-यांना तीन प्रश्नांचं एक कोड टाकल. उत्तर एकाच ओळीत द्यायचे होते. त्याने विचारले -
घोडा क्यों अडा ?
पानी क्यों सडा ?
रोटी क्यों जली ?
नेहमीप्रमाणे बिरबलाने खूप वेळ वाट पाहिली - इतर दरबा-यांना संधी दिली आणि कुणालाच उत्तर येत नाही असं पाहून त्याने कोड्याचं उत्तर तीनचं शब्दात सांगितल - फेरा न था |
फेरा - म्हणजे फिरवणे, उलटणे, गतिशील ठेवणे! घोडा एकाच ठिकाणी बांधून ठेवला, त्याला फिरू दिल नाही तर त्याचे पाय आखडतात, मग गरजेच्या वेळी तो धावू शकत नाही - तो अडतो. पाणी एकाच ठिकाणी साठून राहिले तर सडते - त्यामधे कीडे, डांस, शेवाळ इत्यादी साठतात. खळखळून वाहणारं पाणी शुद्घ होत रहातं. तव्यावरची पोळी उलटली नाही तर जळते. या सर्व समस्यांच उत्तर एकच - त्यांना हलत-फिरत ठेवण, वेळच्या वेळी उलटण, थोडक्यांत - त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांची क्षमता कमी होत नाही ना हे वारंवार तपासणं.
आपल्या आजूबाजूला पण अशी फेरा नसल्याची - खूप उहाहरण दिसतात. अभ्यासाची उजळणी न करणे, रस्ते, इमारती, नदींचे बांध, कालवे यांची वेळेवर दुरूस्ती न करणे, आपण कामात किती मागे पडलो ते तपासून न पहाणे, आपल्या नियमांत कांय दुरूस्त्या करण्याची गरज आहे याचा विचार न करणे, ही सर्व फेरा नसल्याचीच उहाहरणे आहेत.
आपल्याकडे सुमारे दीडशे वर्षांपासून चालत आलेला एक नियम फेरा देउन नव्या युगाच्या दिशेने बदलला तर विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल ते पाहू. आपल्या परीक्षा होतात. त्यासाठी कुणीतरी शिक्षक पेपर सेट करतात. ही एक मोठी डोकेदुखीच असते. म्हणून वर्षाला कसेबसे एकदा पेपर्स सेट केले जातात ते गुप्तपणे छापायचे. ते फुटू नयेत म्हणून खूsssप काळजी घ्यायची. पेपर एकदाच सेट करायला लागावा व एकदाच छापायला लागावा म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकदम घ्यायची. सन् 1850 मधे आपल्या देशांत शाळा आणि परीक्षेची पद्घत लागू झाली तेंव्हापासून हे सगळे नियम चालत आले आहेत. त्याला दीडशे वर्ष लोटली. पूर्वी देशभरात कांही हजार मुलं परीक्षा देत. आता कांही कोटी मुलं परीक्षा देतात. म्हणजे यंत्रणेवर केवढा ताण येत असेल पहा. विद्यार्थ्यांवर तर भयानकच ताण असतो - अगदी आत्महत्येपर्यंत.

पण जरा विचार करा. आता संगणकाचे युग सुरू झाले आहे. संगणकाला आपण खूपसे (म्हणजे समजा पाच सहा हजार ) प्रश्न सांगून ठेवले तर तो त्यांची उलट सुलट जुळणी करून आपल्याला हवी तेंव्हा एक एक प्रश्नपत्रिका तयार करून देऊ शकतो. त्याला फक्त सांगायच - आपल्याला चवथीच्या लायकीचा पेपर हवा की नववीच्या की बारावीचा. तेवढं आपण संगणकाला सांगायच. तसेच भूगोलाचा पेपर हवा की गणिताचा किंवा इतर कुठल्या विषयाचा ते ही सांगायच. अशा त-हेने सोय केली तर दर महिन्याला परीक्षा घेता येतील - आपल्या सोईने कितीही वेळा परीक्षेला बसल तरी चालेल - - आपल्याला अभ्यास झालेला आहे असे पटेल तेंव्हाच. मग शिक्षकांवर जबाबदारी फक्त उत्तरपत्रिका तपासण्याची. तेही एकदम चार-पाच लाख नाही तर थोडे थोडे. अशा त-हेने हवे तेंव्हा जाऊन हव्या त्या विषयांची परीक्षा देऊन टाकता आली तर सगळे भयानक ताण कमी होतील की नाही ? मग आपण आपल पहिली ते बारावी फक्त पुढल्या वर्गात सरकत रहायचं. दरवर्षी मार्च मधेच सगळ्या परीक्षांचा बाऊ वगैरे कांही नाही - हवे तेंव्हा हव्या त्या परीक्षा आटोपून टाकायचा. पहाच विचार करून. आवडेल कां अशी पद्घत ?
--- XXX ---
Following email was later recd. from "raghunath gagil" rdinkar2002@yahoo.co.in
halo leenatai dt-24/01/09
. U are a teacher probably in marathi med school/tuition class etc.
in last 30 yrs a one whole generation has come up, who has learnt in English med. Their parents thought their children would be smarter if sent to convent/ eng med school. Is this proved wrong in todays tech savy world?. I asked head of a eng med school regarding this but no answer was given. U may be knowing better
I have read ur article in todays URJA sup I have this to say
As u pointed out edu system in India is ageold & was d/ned to produce babus.
It gives more * to written part & oral & practicals play secondary role. If I asked a student of 6th std onwards to give me 500 ml of water , what will be his/ her reaction . ? will he use a ½ lit empledgety plastic milk bag to measure? Conclusion is edu system does not give student practical know.
Introduction of compu. Brought out a new form of exam.
In cont. of yr Article u can write on this.ie on line exams .conventional exams are written exams & scoring in many of these depends on yr ability to select proper ( more weightage) QS & attempting them in given time.
In these yr teacher sets a paper that leaks out @ various pts of transfer viz. Teachers, peons,printing press , courier service personnel etc. besides it provides scope for copying & manipulation @ time of checking.finally u get a mrks sht.
Unlike this, on line exams are comp based . all Q papers are stored in comp & student sitting next to u will definetly not get same paper. They are put up on net few minutes before exams & no leakage is likely. Qs are obj type & student is expected to select one of multiple choices.. stud. has to put a tick mrk against correct choice & results are out within 10 minutes. If any of u students has given MSCIT exam u may be knowing this . if ur elder bro has given GRE he may tell u about this wonderful exam sys.
Bye I do hope u write about this
Yrs truly
rdinkar .

मंगलवार, 13 जनवरी 2009

चाउ आणी माउ हे दोघे दोघे भाऊ

चाउ आणी माउ हे दोघे दोघे भाऊ ।
खात होते खाऊ गोड गोड ।।
चाउ आणी माउ खात असताना खाऊ
तिकडून आला काऊ काळा काळा ।।
काऊ म्हणाला चाउ, तुम्ही काय रे करता भाउ।
चाउ म्हणाला खाउ, खातो आम्ही ।।
काऊ म्हणाला चाउ, तुम्ही दोघे दोघे भाउ ।
द्या ना मला खाउ, थोडा तरी ।।
अपूर्ण

कशी होती फड पद्घत -03

लीना मेहेंदळे
leenameh@yahoo.com
kept on son_denare_pakshi
Published in Lokmat , saturday, 17 Jan 2009
भूगोलाच्या धड्यांत आपण नद्यांबद्दल वाचतो. नदीवर धरणं आणि बंधारे बांधून शेतीला पाणी पुरवले जाते. आताच्या युगांत मोठी धरणं बांधली जातात आणि त्यावरून वादही होतात. त्याला छोट्या छोट्या साखळी धरणांचा चांगला पर्याय आहे. अशाच सुमारे चाळीस धरणांची एक साखळी फार पूवी पांझरा नदीवर होती.
सह्याद्रीच्या डोंगरात पांझरा नदी पश्चिमेला उगम पावते आणि पूर्वेकडील उतारावरून खाली येत साठेक गांव ओलांडून धुळे शहरापर्यंत येते. मग शहराला वळसा घालून ती पूर्णपणे पश्चिमेकडे वळते. तिचा संगम तापी बरोबर होतो. बस, इथे पांझरा नदी संपते.
पण सह्याद्रीच्या उंच कडे-कपारीतून धुळे शहरात उतरेपर्यंत मधे जी गांवं लागतात, त्या सर्व गावांनी पेशवे काळात - म्हणजे सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी - नदीवर छोट्या धरणांची एक साखळी बांधली होती. छोटी म्हणजे किती छोटी ? तर जमिनीपासून फक्त पाच फूट उंच बांधातून एक कालवा गावच्या शेतांना पाणी घेऊन जायचा तर दुसरा कालवा बांधाच्या भिंतीला वळसा घालून पुन: नदीत उतरायचा. त्यामुळे नदीला पूर आला तरी पाणी बांधाच्या डोक्यावरून वहात नसे. ते आधीच गावातल्या शेतात किंवा दुस-या रस्त्याने नदीत आलेले असायचे. त्यामुळे बांध सुरक्षित रहायचे.
गावात जाणा-या पाण्यामुळे जी शेती भिजायची त्याचे तीन भाग केले जायचे. त्या-त्या भागातल्या शेतक-यांवर दंडक होता की त्यांनी एका वर्षी ऊस (किंवा केळी), लावली तर दुस-या वर्षी गहू आणि तिस-या वर्षी ज्वारी लावलीच पाहिजे. त्यामुळे तीन वर्षांचा हिशोब पाहिला तर सर्वांना पाणी वाटप समानपणे होऊन त्याचा फायदा प्रत्येकाला सारख्या त-हेने मिळत असे. पिकाला आपोआप फेरा मिळाल्यामुळे जमीनीची प्रत टिकून रहात असे. व्यापा-यांना त्या त्या गावांतून निश्चित किती माल विकत घ्यायचा आहे त्याचा अंदाज येत असे. शिवाय गांव शेतीला एका दिवशी जास्तीत जास्त किती पाणी मिळू शकते? तर कालव्याची पाणी नेण्याची क्षमता असेल तितकेच. म्हणजेच कुणी जास्त पाणी चोरण्याची शक्यताच संपली. नदीला जितके जास्त पाणी येईल ते सर्व खालच्या गावांना व धुळयापर्यंत जात असे.
या सगळया गावांचे गांवकरी मिळून वर्षातून एकदा नदीच्या उगमापासून तर धुळयापर्यंत तपासणी करीत असत. हेतु हा की कुठल्याही गांवाने बंधा-याची उंची वाढवायची नाही किं वा त्यांचा कालवा पण जास्त रूंद करायचा नाही - कारण असे केले तर खालच्या गावांचे पाणी कमी होईल.
शिवाय सर्व गांवकरी मिळून उगमापासून ठिकठिकाणी झाड लावत - म्हणजे पावसाचे पाणी वेगाने निघून जाण्याऐवजी झाडांमुळे अडले जायचे आणि हळू हळू झिरपत नदीत टिकून रहायचे आणि गावांना पिण्याच्या पाण्याची सोय वर्षभर कायम रहायची.
तुम्ही कधीही नदीवर फिरायला जाल तेव्हा विचार करा - असे छोटे बंधारे आपले आपणच बांधता येतील कां ? किती सोप आहे हे तंत्र शिकून घेणं ! आणि हो, नदीशी बोलायचा प्रयत्न करा. मग पहाच मजा. हळू हळू तुम्हाला कळेल की नदी पण आपल्याशी बोलू शकते.
आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात बारमाही धबधबे फार कमी आहेत - जवळजवळ नाहीच. पण हिमाचल, उत्तरांचल, आसाम वगैरे प्रांतात बारमाही छोटे धबधबे आहेत तिथे फार पूर्वी पासून पाणचक्क्या आहेत. पाण्यामुळे भलंमोठं एक लाकडी जातं फिरायचं आणि त्यावर लोकांना गहू, ज्वारी वगैरे धान्य दळून दिलं जायचं. महाराष्ट्रात अशी एकमेव पाणचक्की औरंगाबाद शहरात होती. आता जागोजागी विजेवर चालणा-या गिरण्या सुरु झाल्यामुळे पाणचक्क्यांचा विचार आपण करत नाही. पण हिमाचल, उत्तरांचल, आसाम वगैरे प्रांतांत त्यांचे महत्व अजूनही आहे. आता तर ते जास्त वाढू शकते. आता लाकडी जात्याऐवजी पोलादी जाती, गियर्स इत्यादींच्या सहाय्याने या पाणचक्क्यांमधून चक्क छोटया प्रमाणावर वीज निर्मिती केली जाऊ शकते. त्याने त्या त्या गावांपुरता तरी वीज पुरवठा करता येतो. अशा कित्येक नव्या गोष्टींची आज आपल्या देशाला गरज आहे.
-------------------------------------