मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

गुरुवार, 25 दिसंबर 2008

A Mathematical fun

1) Take a ten digit no, say your mobile no.
2) Take the first 6 digits from left
3) Multiply by 80.
4) Add 1
5) Multiply by 250.
6) Add the no. made by last 4 digits from left.
7) Again add the no. made by last 4 digits from left.
8) Subtract 250
9) Divide by 2
10)Try to recognize the no. Any relation with the no. u chose???
-----------------------------------------------------------------
Can you modify the trick for any 8 digit no ??? Or a 6-digit no ???

मंगलवार, 28 अक्तूबर 2008

ना परतीची वाट -02

ना परतीची वाट
Lokmat dt 10 jan 2009
kept on son_denare_pakshi
पंचतंत्रात एक खूप छान कथा सांगितली आहे. एक म्हातारा सिंह शिकार जमेना म्हणून तळयाच्या काठाशी राहू लागला. पाणी प्यायला छोटे जनावर आले की तो त्याला मारुन खाऊ शकत असे. एकदा एक कोल्हा त्या जागी आला. दुरुनच निरखून पाहिले तो त्याला कळले की इथे प्राण्यांची जी पावले उमटली आहेत ती फक्त तळयाकडे जाणारी आहेत, तिकडून परत येणारी पावल दिसतच नाहीत. ही “ना परतीची वाट” आपल्याला नको, अस म्हणून कोल्हा तिथून दुसरीकडे निघून गेला, असे त्याचे प्राण वाचले.

तुम्हाला ना परतीच्या वाटेची पुष्कळ उदाहरण माहीत असतील. मोजू या तर. खूपसे रस्ते वन-वे असतात. कित्येक इमारतींना इन-गेट वेगळे आणि आऊट-गेट वेगळे असते. ही झाली दोन उदाहरणे. सर्व व्हॉल्वस्‌ हे याच उपयोगासाठी असतात - की द्रव पदार्थांचा प्रवाह फक्त एकाच दिशेने होऊ द्यायचा, त्यांना उलट दिशेने जाऊ द्यायचे नाही. आपल्या हदयातील रक्त वरच्या कप्प्यांतून खालच्या कप्प्यांत जाते तिथे असाच व्हॉल्व असतो. शिवाय तुम्ही ऑस्मोसिसच्या (osmosis) धडयापर्यंत पोचला असाल, तर तेही असेच एक उदाहरण आहे. कांही पडदे असे असतात की जे एखाद्या द्रव पदार्थाला फक्त एकाच बाजूने जाऊ देतात पण परत येऊ देत नाहीत. आपल्या शरीरांतील सेल्स वरील आवरण अशाच प्रकारचे असते, आणी ते आवरण ऑस्मोसिस ची क्रिया करून सेल मधे सोडियम, पोटॅशियम आदि चे घटक किती प्रमाणांत जाऊ द्यायचे त्यावर नियंत्रण ठेवते.

साधीशी वाटणारी काच पण उष्णतेच्या बाबतीत अशीच “ना परतीची वाट” ठरते. काचेच्या घरावर सूर्याची किरणे पडली की त्या किरणांची उष्णता आणि दृश्यता (प्रकाश) दोन्हीं काचेतून आत जातात. मात्र, उष्णता बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे कांचेच्या घरातले तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा जास्त असते. युरोपिय देशांमध्ये खूप थंडी पडते, तिथे याचा छान उपयोग केला जातो. तिथे घरांना मोठया-मोठया कांचेच्या खिडक्या लावतात, म्हणजे आत येणारी उष्णता टिकून रहाते. तसेच भाजीपाला, फळे, फुले पिकविण्यासाठी कांचेची घरे तयार करतात. म्हणजे आतल्या वनस्पतींना ऊब मिळून ती हिरवीगार व ताजीतवानी रहातात. थंडीने मरुन जात नाहीत. याला ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतात.

कर्बवायू म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड देखील सूर्य किरणांसाठी अशीच ना परतीची वाट तयार करते. पृथ्वीच्या वायुमंडळात जेवढे जास्त कार्बन डाय ऑक्साइड असेल तेवढया जास्त प्रमाणात सूर्य किरणांची उष्णता आत (पृथ्वीवर) येऊ दिली जाईल पण बाहेर जाऊ दिली जाणार नाही. अशाप्रकारे लाखो वर्षांपूर्वी ज्या काळात बर्फ युग (ice-age) होते व थंडीमुळे जीवसृष्टीला जगायची मारामार होती तेंव्हा कार्बन डाय ऑक्साइडच्या या गुणधर्मामुळे हळूहळू पृथ्वीवरील थंडी कमी होऊ लागली आणि जीवसृष्टीची भरभराट झाली. पण........

पण गेल्या लाखो वर्षांत पृथ्वीवरचे तापमान हळूहळू वाढतच राहिले. इतके की आता नको तो कार्बन डाय ऑक्साइडचा गुणधर्म असे सगळयांना वाटू लागले. कार्बन डाय ऑक्साइडचे नांव पडले ग्रीन हाऊस गॅस (GHG) . त्याचा जीएचजी इफेक्ट आता सर्वांना नकोसा झाला आहे. पण गुणधर्म थोडाच बदलता येणार. त्याला उपाय म्हणजे पृथ्वीवरचा कार्बन डाय ऑक्साइड कमी करणे हाच.

तर आता तुम्हाला होमवर्क असे की, पृथ्वीवरील कार्बन डाय ऑक्साइड कशा कशामुळे वाढते. त्याची यादी तयार करा आणि कशामुळे कमी होऊ शकते ती पण यादी करा. तसेच पृथ्वीवर कार्बनचा किती साठा आहे आणि तो कुठे कुठे आहे ती पण माहिती घ्या. आणि मोठ्ठं कोडं –पृथ्वीवर कार्बन डाय ऑक्साइड किती वाढला हे कसं मोजतात ?

आपल्या जीवसृष्टीला कार्बन-जीवसृष्टी म्हणतात. कारण कार्बन चेनने बनलेले कित्येक अणु-रेणू हेच आपल्या शरीराचे मूल घटक असतात हे मात्र विसरायचे नाही.

कोड्याचं उत्तर तपासूया पुढच्या कांही आठवडयांत.
-------------------------------------------------------
Also on http://www.geocities.com/son_denare_pakshi/na_partichi_vat.html
ALso the mangal and pdf files.

सोमवार, 18 अगस्त 2008

हुषार गणिती -01

हुषार गणिती
-लीना मेहेंदळे
Lokmat dt 3 jan 2009
kept on son_denare_pakshi/lokmat
सुटी संपली. शाळा सुरु झाली की नवीन वर्ग, नवीन पुस्तकं, नवे शिक्षक आणि कांही नवी मित्रमंडळी पण मिळतात. मग त्यांच्यासाठी नव्या गोष्टी हव्याच.

एका हुषार गणिती माणसाने एक गोष्ट रचली. म्हणे एक श्रीमंत शेठ होता. अफाट संपत्ती आणि सतरा हत्ती बाळगणारा. मरतांना त्याने आपली संपत्ती तीन मुलांना वाटली. त्यामध्ये इतर कुठे अडचण नव्हती. पण हत्तींबाबत त्याने लिहून ठेवले होते की, मोठया मुलाला 1/2, मधल्या मुलाला 1/3, आणि धाकटयाला 1/9 हत्ती द्यावेत. हे कस करणार? (गणितात हुषार कोण कोण आहेत तुमच्यापैकी ? चालवा डोकं ---- एक, दोन, पांच मिनिटच फक्त हं !)

मग समस्या गेली राजाकडे. त्याचा एक बुध्दिमान मंत्री होता. त्याने आपला एक हत्ती आधी मुलांना देऊ केला. आता झाले अठरा हत्ती. त्यातले मोठया मुलाला 1/2 म्हणजे नऊ, मधल्याला 1/3 म्हणजे सहा व धाकटयाला 1/9 म्हणजे दोन हत्ती दिले आणि आपला हत्ती परत घेतला.

ही गोष्ट खूप गाजली. लोकांना खूप आवडली. त्यांनी एकमेकांना आवडीने ऐकवली. खूप वर्ष गेली. मग अजून एका हुषार गणितीला वाटल, अरे, आपण ही गोष्ट वाढवू शकतो. त्याने पुढे भर टाकली. ती अशी ---

मंत्र्याच्या न्यायाने सगळे खूष झाले असतानाच मोठया मुलाला वाटले छे:, सगळे हत्ती आपल्यालाच मिळायला हवेत. त्याने राजाकडे निवेदन दिले. सतरा हत्तींचे वाटप पुन्हा करा - ही पध्दत मला पसंत नाही. राजा चिडलाच. पण राग न दाखवता त्याने मंत्र्याला बोलावले. दोघांनी आपसांत कांही कुजबूज केली. मग दरबार भरला तो गांवातील नदीच्या पुलाजवळ. आता मंत्र्याने सांगितले - ते माझा हत्ती घेऊन केलेले वाटप विसरा. आता मी नव्याने वाटप करतो.

त्याने नदीच्या पुलावर एक हत्ती आणि पुलाखाली दोन हत्ती उभे कले - हे बघा, एकाखाली दोन म्हणजे 1/2 हत्ती. - इथे पुलाने आडव्या रेघेचे काम केल आहे. हा वरचा एक आणि खालचे दोन हत्ती मोठया मुलाचे. मग पुलावर एक आणि खाली तीन हत्ती ठेऊन म्हणाला हे 1/3 म्हणजे चार हत्ती मधल्या मुलाचे. शेवटी पुलावर एक आणि खाली नऊ हत्ती ठेऊन म्हणाला हे 1/9 म्हणजे दहा हत्ती धाकटया मुलाचे. सगळया जनतेने आणि दरबाराने म्हटले - ठीक, ठीक, आता चांगला न्याय झाला. कारण लोभी माणसांना अद्दल घडवणे हे पण न्यायाचे काम असतेच.

अशाच खूप गोष्टी, खूप कोडी, खूपशा अभ्यास करण्याच्या युक्त्या वगैरे वगैरे आपण बोलूया. तुमच्याकडील प्रश्न, युक्त्या आणि गोष्टी मला कळवा. त्याही आपण या सदरातून सर्वांना सांगू. विषय असतील परिसर, विज्ञान, पर्यावरण, आकाश, ऋतू, फुलं, पाखर .. .. असे खूप काही. दर आठवडयाला एक.

तुम्ही वाचल असेल - जगात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढतय म्हणून जागतिक तापमान वाढतय. त्यातून त्सुनामी सारखी वादळं येतात.. .. तर मुद्दा हा - वातावरणात कार्बन डायऑक्साइडच प्रमाण किती होत - दहा वर्षांपूर्वी किती आणि शंभर वर्षांपूर्वी किती, हे आता मोजायच असेल तर कस मोजतात? शोधा याचं उत्तर.किंवा थोडी वाट बघा, आणी
याच ठिकाणी पुन्हा कधीतरी मी ती युक्ती पण सांगेन.

तसच तुमच्या शहरात कांही कांही ठिकाणी ट्रॅफिक जाम मुळे धूर, प्रदूषण खूप वाढते. तिथल्या पोलीस कॉन्स्टेबल्सना मास्क लावावा लागतो. तिथे आता कांही लोक प्रदूषण मापक यंत्र बसवतात - म्हणजे लोकांना कळाव - की पहा इथे प्रदूषण किती वाढलय्‌. पण हे कळल्यावर सुध्दा लोक गप्पच बसले - त्यांनी आणि प्रशासनाने मिळून कांहीच केले नाही तर कांय? मुलं काय करू शकतात ?

त्याच छोटस उत्तर आहे. सई परांजपे यांच्या चकाचक नावाच्या सिनेमात. बघाच तो.

आता बाय्‌ बाय्‌. पुन्हा भेट पुढल्या आठवडयांत.

-----------------------------------
Also on http://www.geocities.com/son_denare_pakshi/hushar_ganiti.html
ALso the mangal and pdf files.

मंगलवार, 5 अगस्त 2008

अंतरिक्ष यात्रा

अंतरिक्ष - यात्रा

एका शहरात एक सुखी परिवार होता - रघुवीर, त्यांची पत्नी उर्मिला आणि तीन गोंडस मुल - प्रेमा, शकुन आणि नितिन. मुलं अभ्यासात हुषार होती. खेळातही प्रवीण होती. प्रेमा बरीच मोठी आणि समजूतदार होती. तिच कधी कुणाशी भांडण होत नसे. उलट इतरांची भांडण झाली तर सोडवायला आणि समजूत घालायला सगळे तिचीच वाट बघत. कुणाला अभ्यासात मदत हवी असेल तर तेही तीच करत असे.

पण शकुन आणि नितिनच तस नव्हत. त्यांच्यात अंतर कमी होत. त्यामुळे त्यांच्यात सारखी भांडण होत असत. ते सोडवतांना उर्मिलेच्या नाकी नऊ येत. दोघांना खेळायला तेच खेळण हव असे आणि वाचायला तेच पुस्तक. शिवाय दोघांना वेगळया ठिकाणी नेल तर त्यांना चालत नसे. दोघांची मिळून एक स्वतंत्र खोली होती. तिथे बसून एकत्र अभ्यास, एकत्र खेळ आणि खूप भांडण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. भांडण झाले की उर्मिला वैतागून जायची. शकुनला म्हणायची - शकुन, लहान भावाला कां त्रास देतेस - त्यांच्याशी भांडू नकोस.

दोघांना एकच खेळण हव असेल तर उर्मिला म्हणायची - शकुन, तुझा लहान भाऊ आहे, देऊन टाक त्याला ते खेळण. शाळेत जातांना नितिन कुठे इकडे तिकडे रेंगाळला तर शकुनला ऐकाव लागत असे - छोटया भावाला सांभाळून शाळेत नाही नेऊ शकत? आणि कधी चुकून माकून शकुनने त्याला थप्पड मारली तर सगळयांचाच ओरडा खावा लागे - छोटया भावावर हात उगारलास?

एकूण कांय तर या घरांत शकुनला नेहमीच ऐकून घ्याव लागत असे. प्रेमा वयाने बरीच मोठी - ती कॉलेजात जाणारी, तिच विश्र्व वेगळ. तिच्या मित्र-मैत्रिणी, तिची अभ्यासाची आणि इतर वाचनाची पुस्तकं, तिचे कार्यक्रम आणि सहली, या सर्वांत शुकनला अजून जागा नव्हती. कांही वर्ष थांबाव लागणार होत. ती ज्या वयांत होती, त्या वयातला जोडीदार नितिनच होता. तो तिचा लाडका भाऊ होता. तिच्या बरोबर खेळायला, अभ्यासला आणि भांडायला पण तोच होता. त्या भांडणांच शकुनला कांहीच वाटत नसे. पण तिची तक्रार होती इतरांबद्दल - आई, बाबा, आजी, प्रेमा, शाळेचे शिक्षक | कारण कोणत्याच भांडणात ते तिच्या बाजूने बोलत नसत. प्रत्येक वेळा तिलाच ऐकाव लागे - तुझा लहान भाऊ, करुन ते त्याच काम. लहान भाऊ आहे - जे मागतोय्‌ ते देऊन टाक. लहान भाऊ आहे - त्याच्यावर हात उगारु नकोस.

एकदा त्यांचे मामा त्यांच्या गांवी आले. ते खूप वर्षांनी स्वीडन मधून आले होते. येतांना सगळयांसाठी खूप खूप वस्तु, चॉकलेटस्‌, खेळणी, खाद्यपदार्थ, गोष्टीची पुस्तक घेऊन आले होते. खेळण्यांमध्ये एक विमान होत शकुनसाठी आणि एक रणगाडा होत नितिनसाठी.

आधी शकुनला तो रणगाडाच हवाहवासा वाटला. तो सुळकन्‌ दिशा बदलायचा. तोळा उडवायच. झालाच तर उपडा होऊन पुन: सरळ व्हायचा. तिने नितिनकडे रणगाडा मागितला पण त्याने सरळ नकार दिला.

मग तिने विमानातच मन गुंंतवल. विमान घेऊन ती कल्पना करु लागला की हे विमान खरोखरीच उडू शकत. हे मला कुठेही नेऊ शकेल. दिल्ली, कलकत्ता, किंवा ढगांच्या पलीकडे, किंवा चंद्रावर! होयच मुळी, हे विमान तर मला चंद्रावर घेऊन जाईल.

हे शेवटच वाक्य ती मोठयाने बोलली. नितिनने ते ऐकल. चंद्रावर घेऊन जाणारं विमान! मग ते मला पण हव. त्याने शकुनकडे विमान मागितल. झाली भांडणाला सुरुवात!

बाहेर वसलेल्या मोठया माणसांनी आतून भांडायचे आवाज ऐकले आणि सवयीप्रमाणे उर्मिला म्हणाली - शकुन, तुझा लहान भाऊ आहे. भांडू नकोस. देऊन टाक त्याला विमान.

पण आज शकुन खूपच चिडलेली होती. ती म्हणाली - नाही देणार. तो तर आयुष्यभर माझ्यापेक्षा लहानच राहील. म्हणजे कांय माझ्या सगळया वस्तू त्याला देऊन टाकायच्या?

प्रेमाने हा प्रश्न ऐकला आणि तिच्या मनांत एक वेगळाच विचार चमकला. मामांनी तिच्यासाठी आणलेल्या पुस्तकांत तिने नुकतीच आइन्स्टाइनची गोष्ट वाचली होती. अल्बर्ट आइन्स्टाइन हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच महान वैज्ञानिक म्हणून गाजले. त्यांना नोबेल पारितोषकही मिळाले. त्यांनी जगातली बरीच कोडी सोडवता येतील अशा एका सिध्दातांची मांडणी केली होती. थियरी ऑफ रिलेटिव्हिटी. जगांत फिरणा-या सर्व वस्तू - चंद्र, सूर्य, पृथ्वी, नक्षत्र, सौरमालिका - सगळे एकमेकांच्या सापेक्ष वेगाने फिरत असतात. त्यांना पहाणारा माणूस, त्यांच्यावर प्रयोग करणारा माणूस, तोही वेगाने फिरतच असतो. अशा सापेक्ष गतीला आपले साधे नियम लागू पडत नाहीत. वेगळे नियम लागू पडतात. प्रकाशाच्या वेगाचेही एक आगळेवेगळे महत्व असते - असा कांहीसा तो सिध्दांत होता. तो कांही प्रेमाला खूप नीटसा उलगडला नव्हता. पण त्या सिध्दांतावरुन एक निष्कर्ष असा निघत होता की, जर कोणी व्यक्ती खूप वेगाने फिरणा-या रॉकेटमध्ये बसून खूप लांबचा प्रवास करुन आली तर परत आल्यावर तिचे वय कमी वाढलेले असेल - पण त्याच काळात पृथ्वीवरच्या माणसांचे वय नेहमी सारखेच वाढलेले असेल.

थोडक्यांत जर शकुनला एखाद्या रॉकेटमध्ये बसवून लांबच्या अंतरिक्ष यात्रेला पाठवले तर परत आल्यावर ती नितिनपेक्षा लहान झालेली असेल. मग तिला रोज रोज ऐकाव लागणार नाही - तो लहान भाऊ आहेना!

मग कांय? तिने मामांना आपला विचार बोलून दाखवला. दोघांनी चर्चा करुन ठरवल - हे करायच. त्यांनी जगभरातल्या अंतरिक्ष संस्थांची मदत घेतली. खूप पत्रव्यवहार झाला. तयारी झाली आणि शेवटी एक दिवस खरोखरच शकुन अंतरिक्ष यानात बसून उड्डाण करुन गेली. आता ती पाच वर्षानंतरच परत येणार होती.

शकुनच्या परतीचा दिवस जवळ येऊ लागला तस घरात आनंदाच वातावरण तयार झाल. एव्हाना प्रेमाच लग्न होऊन गेल होत आणि नितिनही आता कॉलेजात जाऊ लागला होता. घरात सगळयांना उत्सुकता होती की शकुन येईल ती कशी दिसेल. तिने देशालाही सन्मान मिळवून दिला होता. तिचे अंतरिक्ष यान उतरण्यासाठी दिल्लीजवळ एक खास अंतरिक्ष स्टेशन बनवले होते. खुद्द पंतप्रधान तिचे स्वागत करणार होते. वैज्ञानिकांनी तिला खूपसे फोटो घ्यायला सांगितले होते, तशीच इतर बरीचशी वैज्ञानिक निरीक्षणेही तिने करायची होती. पेपरांमध्ये तिचे फोटो झळकत होते. तिला अंतरिक्ष भ्रमणाला का पाठवले - ती गोष्टही झळकली होती. ती नितिनपेक्षा लहान व्हावी. मग तिला सारख ऐकाव लागू नये - तो तुझा लहान भाऊ ना!

तोही दिवस उजाडला. शकुनचे अंतरिक्ष यान पृथ्वीवर टेकले. तिचे जंगी स्वागत झाले. सर्वांत आधी वैज्ञानिकांनी तिचा ताबा घेतला. त्यांची सगळी उपकरण, फोटो, निरीक्षणांची वही वगैरे त्यांना सोपवून झाली. मग पत्रकार. मग इतर मान सन्मान. शेवटी सर्व समारंभ संपवून शकुन एकदाची घरी आली.

ती अवकाशांत गेली तेंव्हा बारा वर्षांची होती आणि नितिन दहा वर्षांचा. आता पांच वर्षांनंतर तो झाला होता. पंधरा वर्षांचा पण शकुनच वय मात्र दोनच वर्षांनी वाढल होत. ती लहान झाली होती.

घरी खूप नातेवाईक, शिक्षक, मित्र-मैत्रिणी गोळा झाले होते. बाहेर बसून सगळयांचा गप्पा चालू होत्या.

नितिन तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेला. इथेच त्यांचा अभ्यास, खेळण, आणि भांडण होत असे. जिकडे-तिकडे नितिनची पुस्तक आणि सामान पसरलेल होते. मात्र, तिच्या पलंगाशेजारी दोन कपाटात तिची पुस्तक, खेळ आणि कपडे व्यवस्थित रचून ठेवले होते. तिच्यासाठी नुकत्याच सर्वांनी आणलेल्या भेटवस्तूही पलंगावर रचलेल्या होत्या. नितिन तिला सर्व दाखवू लागला. त्यांच्यांत नेहमी सारख्याच गप्पा होऊ लागला आणि एका पुस्तकावरुन नेहमीसारखच भांडण सुरु झाल.

बाहेरुन ऊर्मिलाने भांडणाचा आवाज ऐकला आणि नेहमीप्रमाणे शकुनला रागावली. शकुन - त्याच्याशी भांडतेस? तो तुझा मोठा भाऊ आहे आता! त्याच ऐकत जा. भांडण थांबव. शकुन म्हणाली - तो तुझा मोठा भाऊ आहे - पण आता तो जन्मभर माझा मोठा भाऊच रहाणार. म्हणजे कांय तू जन्मभर त्याचीच बाजू घेणार?

हा तिचा प्रश्न प्रेमाने ऐकला आणि मामांनी पण ऐकला. ते विचार करत आहेत - आता नितिनला अंतराळ यात्रेवर पाठवून द्यावे कांय? तुम्हाला कांय वाटते ?

*********
To go on ye_ye_pawsa

शनिवार, 10 मई 2008

आदित्य -- Aditya Mehendale -- एक मनस्वी माणूस



Once Aditya went to a school of adiwasi children. There he taught them about electricity. Later he liked the contents and way he had delivered the lectures. So he decided to write a book. "VEEJ" In Marathi and "BIJLEE" in Hindi
बिजली -- प्रस्तावना -- डॉ. अरुण निगवेकर


Abstract of his Ph.D. thesis
PhD defence by Aditya Mehendale (Control Engineering) Date:02-10-2008
Drebbel institute, University of Twente,
Title: Coriolis Mass Flow Meter
Abstract: The accurate and quick measurement of small mass flow rates (~10 mg/s) of fluids is considered an “enabling technology” in semiconductor, fine-chemical, and food & drugs industries. Flowmeters based on the Coriolis effect offer the most direct sensing of the mass flow rate, and for this reason do not need complicated translation or linearization tables to compensate for other physical parameters (e.g. density, state, temperature, heat capacity, viscosity, etc.) of the medium that they measure. This also makes Coriolis meters versatile – the same instrument can (without re-calibration) measure hydrogen at one instant and honey the next.
Coriolis meters scale poorly, however; the challenge to systematically design a Coriolis meter for low flows is dealt with in this research. A mechatronics approach adopted from the inception and the use of novel concepts alongside proven design and construction principles is presented.
A fully working prototype is presented as a test case to assess the effectiveness of the concepts and design choices.


Aditya Mehendale's web site

शुक्रवार, 21 मार्च 2008

टप टप टप टप टाकीत टापा---- As sung by aditya at 4

टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा - video
As sung by Aditya and Suhas Barje when both were around 4 years of age.
टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा - audio file

कन्नड ----- नौ का पहाडा

कन्नड ----- नौ का पहाडा --- देवनागरी, व कन्नड
नवाचा पाढा
(कानडी Table of Nine)
ओंबत्तर मग्गियेल्ली ओंबत्तर गंम्मत्तु
कुडिसिदरे येल्लवु ओंबत्तु
योचिसी नोडिरे लेक्कवु माडिरे
येल्लवु ओंबत्ते ओंबत्तु ।।

ओंबत येरडली हदनेंटु, ओंबत्त येरडली हदनेंटु
वंदु मत्ते यंटु आयतु ओंबत्तु
योचिसी नोडिरे लेक्कवु माडिरे
येल्लवु ओंबत्ते ओंबत्तु ।।

ओंबत मूरली इप्पत्येळळू  ओंबत मूरली इप्पत्येळळू
येरडु मत्ते येळू आयतु ओंबत्तु
योचिसी नोडिरे लेक्कवु माडिरे
येल्लवु ओंबत्ते ओंबत्तु ।।


ओंबत ............... ओंबत .................

..... मत्ते ....आयतु ओंबत्तु
योचिसी नोडिरे लेक्कवु माडिरे
येल्लवु ओंबत्ते ओंबत्तु ।।

ओंबत ऐदली नलवत्तैदु  ओंबत ऐदली नलवत्तैदु
नाकु मत्ते ऐदु आयतु ओंबत्तु
योचिसी नोडिरे लेक्कवु माडिरे
येल्लवु ओंबत्ते ओंबत्तु ।।

ओंबत आरली ऐवतनाकु-
ऐदु मत्ते नाकु आयतु ओंबत्तु
योचिसी नोडिरे लेक्कवु माडिरे
येल्लवु ओंबत्ते ओंबत्तु ।।

ओंबत येळली आरवतमीरू
आरू मत्ते मुरू आयतु ओंबत्तु
योचिसी नोडिरे लेक्कवु माडिरे
येल्लवु ओंबत्ते ओंबत्तु ।।

ओंबत येंटली यपत्तयेरडु-
येळू मत्ते येरडु आयडु ओंबत्तु
योचिसी नोडिरे लेक्कवु माडिरे
येल्लवु ओंबत्ते ओंबत्तु ।।

ओंबत ओंबतली यंबतोंदु
यंटु मत्ते वंदु आयतु ओंबत्तु
योचिसी नोडिरे लेक्कवु माडिरे

येल्लवु ओंबत्ते ओंबत्तु ।।

ओंबत हतली तोंबत्तु
ओंबत्तु मत्ते सोने आयतु ओंबत्तु
योचिसी नोडिरे लेक्कवु माडिरे

येल्लवु ओंबत्ते ओंबत्तु ।।

अनुवाद -- हेमा सुब्बाराव
(-sanskrit school for girls) 

कन्नड ----- नौ का पहाडा --- कन्नड

Table of Nine
---ÆÞ«Û ÈæßÞÔæÞ«Ú§×æÞ (ÈÚßÁÛqÞ }Ú¢Û Õ¬§Þ)

OÚ«Ú­sÚ @«ÚßÈÛ¥Ú.....ÔæÞÈÚáÛ ÑÚß·Û¹ÁÛÈÚ
(Hema Subbarao)

KM¶}Ú¡ÁÚ ÈÚßWX¾æßÞÆÇÞ KM¶}Ú¡ÁÚ VÚMÈÚß°}Úß¡
OÚßtÒ¥ÚÁæÞ ¾æßÞÄÇÈÚâ´ KM¶}Úß¡

¾æàÞ_ÒÞ «æàÞtÁæÞ ÅæÞOÚQÈÚâ´ ÈÚáÛtÁæÞ
¾æßÞÄÇÈÚâ´ KM¶}æ¡Þ KM¶}Úß¡

KM¶}Ú ¾æßÞÁÚsÚÆÞ ÔÚä¥Ú«æÞMlß,
KM¶}Ú¡ ¾æßÞÁÚsÚÆÞ ÔÚä¥Ú«æÞMlß
ÈÚM¥Úß ÈÚß}æ¡Þ ¾ÚßMlß A¾Úß}Úß KM¶}Úß¡
KM¶}Ú ÈÚßßÁÚàÆÞ B¯°}æÀÞ×Ú×Úà- 2                   

¾æßÞÁÚsÚß ÈÚß}æ¡Þ ¾æßÞ×Úà A¾Úß}Úß KM¶}Úß¡
KM¶}Ú I¥ÚÆÞ «ÚÄÈÚ}æë¥Úß- 2

«ÛOÚß ÈÚß}æ¡Þ I¥Úß A¾Úß}Úß KM¶}Úß¡
KM¶}Ú AÁÚÆÞ IÈÚ}Ú«ÛOÚß- 2

I¥Úß ÈÚß}æ¡Þ «ÛOÚß A¾Úß}Úß KM¶}Úß¡
KM¶}Ú ¾æßÞ×ÚÆÞ AÁÚÈÚ}ÚÉßÞÁÚà
AÁÚà ÈÚß}æ¡Þ ÈÚßßÁÚà A¾Úß}Úß KM¶}Úß¡
KM¶}Ú ¾æßÞMlÆÞ ¾Úß®Ú}Ú¡¾æßÞÁÚsÚß- 2

¾æßÞ×Úà ÈÚß}æ¡Þ ¾æßÞÁÚsÚß A¾ÚßsÚß KM¶}Úß¡
KM¶}Ú KM¶}ÚÆÞ ¾ÚßM¶}æàÞM¥Úß
¾ÚßMlß ÈÚß}æ¡Þ ÈÚM¥Úß A¾Úß}Úß KM¶}Úß¡
KM¶}Ú ÔÚä}ÚÆÞ }æàÞM¶}Úß¡
KM¶}Úß¡ ÈÚß}æ¡Þ ÑæàÞ«æÞ A¾Úß}Úß KM¶}Úß¡

----------------------------------------------

इतर बरेच....many more stories for children

हुषार गणिती
ना परतीची वाट
कशी होती फड पद्घत
घोडा क्यों अडा
जागतिक तापमान वृद्धि कैसे होती है
तीन धूर्त ब्राह्मण -- पंचतंत्र कथा
चाउ आणी माउ हे दोघे दोघे भाऊ ... काय बरे करत होते..

पांढरी फुले
सफेद फूल
फूल आओ आओ
संत मुद्गल की कहानी -युधिष्ठिर कथा
रेड हेडेड लीग -- शरलॉक होम्स कथा -- मराठी
----------------------------------------------
All zip files also on ye_ye_pawsa

3 plays for children -- शोधावे लागतील

ये ये पावसा -- played on AIR Sangli 1984, Aditya played SEA while Hrishi played WIND.
इथे वाचा

गणित विषय माझ्या आवडीचा --- played on AIR Sangli 1985, later with different cast on AIR Pune in 1987. In both, Aditya played Prince Chandrasen and Hrishi played his friend Mangal
इथे वाचा


अनिल आणि कम्प्यूटरची गोष्ट ---- इथे वाचा

शनिवार, 12 जनवरी 2008

निरोगी शरीर आणि मन -- healthy body and mind - marathi

निरोगी शरीर आणि मन

अभिभावक की डगर 3 --जानो अपनी समृद्धि को

अभिभावक की डगर 3
जानो अपनी समृद्धि को
published in Himalayan Oasis, Simla, issue 3

-----------------------------



जानो अपनी समृध्दि को
      -  लीना मेहेंदळे
   हमारा देश और संस्कृति दोनों अतिप्राचीन हैं |अतएव इतका जतन करना भी हमारी जिम्मेदारी बन जाती है |  जतन करने की कई विधाओं में सबसे महत्त्वपूर्ण है नामकरण और गिनती |
   क्या पशुपक्षी भी एक दूसरे को नाम से पहचानते या बुलाते हैं?  शायद नही |  कमसे कम हम मनुष्यों को तो यह नही मालूम |  लेकिन हम अपने संगी साथियोंको नाम से पहचानते हैं | घर में नया शिशु जन्म लेता है ती जल्दी से उसका नामकरण करते है | घर मे कोई प्रिय जानवर हो, जैसे गाय, बकरी, कुत्ता, घोडा, सांड तो उनका भी हम नामकरण करते हैं |  इस प्रकार नामकरण से यह सुविधा होती है कि उस व्यक्ति की बाबत बात करना आसान हो जाता है | हम वस्तुओं के भी नाम देते हैं |  व्याकरण मे सबसे पहले हम नाम या संज्ञा के विषय में ही पढते हैं |  किसी वस्तु के नाम के साथ जब हम उसका बखान करते हैं तो इससे ज्ञान के विस्तार में सुविधा होती है |  यही बात गणित और गिनती के साथ भी है |
  
खगोल शास्त्र और अंतरिक्ष विज्ञान का आरंभ हमारे ही देश से हुआ |  हमारे पूर्वजों ने आकाशीय ग्रह-नक्षत्रों के नाम रख्खे |  उनकी गतिविधियों का निरीक्षण किया |  और पाया कि नक्षत्रों के बीच विचरण करता सूर्य घूमघाम कर 365 दिनों बाद वापस अपने पूर्वस्थान पर आ जाता है |  इसी संख्या से किसी वृत्ताकार वस्तु के अंश गिनने की विधी बनी |  चूँकि 365 थोडा औडम आँकडा है जब कि उसके नजदीक 360 का आँकडा बडा अच्छा - उसमे 2,3,4,5,6,8,9,10,12,15,18,20,30,40 आदि कई अंको से भाग लग जाता है, इसलिए वृत्तांश गणना और कालगणना दोनों के लिये उपयुक्त आँकडा चुना गया 360 का |  यों वर्ष के दिन तय हुए 360 |  और जो 5 दिन बचे उनका क्या ?  साथ ही - देखा गया कि चंद्र भ्रमण और सूर्यभ्रमण की गिनती भी एक जैसी नही है | चंद्रमा को उसी नक्षत्र स्थिती में आने के लिये करीब 27 दिन लग जाते हैं | इस प्रकार तय हुआ कि मोटे तौर पर 360 दिनों का एक वर्ष और 30 दिनों का 1 महिना - यों 12 महिने का भी एक वर्ष |  लेकिन यह मोटे तौर पर। ज्योतिषीय गणना के लिये इन 30 दिनों को शुक्ल और कृष्ण पखवाडों में विभाजित किया गया|  इनमें से हर माह कुछ तिथियों का क्षय हो जाता है तो अत्यल्प मात्र में कभी कोई तिथी अधिक भी हो जाती है |  और 3 वर्षों मे एक बार अधिक मास भी आ जाता है |  इन दो विधियों से चांद्रमास और सौर-वर्ष की गणना में आए अंतर को पाटा जाता है |  इसका विस्तारपूर्वक वर्णन मैंने अपनी आकाशदर्शन की प्रकाशनाधीन पुस्तक में किया है |
  
इसके साथ ही अंतरिक्ष में नक्षत्रों का भी नामकरण हुआ |  उनकी भी गतिविधियोंका निरीक्षण हुआ |  खगोलशास्त्र की पढाई हुई और उसके आगे फलित - ज्योतिष का विकास हुआ - अर्थात्‌ नक्षत्रोंकी गतिविधियों का मनुष्य पर, पृथ्वी की घटनाओं पर, मौसम, जलवायु, समुद्री हवाओं पर, बारिश पर इत्यादि क्या प्रभाव पडता है| हालाँकि नक्षत्रों का नामकरण ग्रीक संस्कृति में भी हुआ लेकिन भारत में नामकरण के आगे फलित - ज्योतिष का भी विकास हुआ |  जो ग्रीक संस्कृति में नही हुआ |
  
आज जरूरी है कि अभिभावक होने के नाते हम यह सारा इतिहास बच्चों के साथ कहें - सुनें - बाँटे |  इस्त्रायल मे, यहूदियों में यह प्रथा है कि उनके नववर्ष के दिन घर के सबसे बुजुर्ग व्यक्ति पूरे परिवार को साथ बिठाकर उनसे यहूदियों का पूरा इतिहास बयान करते है |
  
हमारे देश मे भी आचार्य - शिष्य परंपरा में गुरू अपने शिष्यों को पास बैठाकर और सुनाकर - उन्हें ज्ञान और शिक्षा देते थे |  इसी को उपवास अर्थात्‌ गुरू के पास (या परमात्मा के पास) बैठना कहा जाता था | 
लेकिन आज जो मैं कहना चाहती हूँ वह बात केवल पास बैठकर, सुनकर ज्ञान देने - लेने की बात नही है |  बात नामकरण और गिनती की है |  हमारी धरोहर जो हिमालय है उसके कई छोटे बडे शिखरों में ही हिमाचल प्रदेश बसा  है | इनमें से कई शिखरों के स्थानीय नाम हैं और प्राय हर शिखर पर किसी देवता का मंदिर है। लेकिन आवश्यकता इस बात की है कि इन में से हर छोटे बडे शिखर का नामकरण गाँव के बुजुर्गोंकी सलाह से, हमारी भाषा में होना चाहिये और उनकी गिनती की खास पध्दति बना कर उनकी गणना भी होनी चाहिये | लाईब्रेरी के पुस्तकों की तरह पर्वत शिखरोंकी गिनती की भी एक खास पद्धति होती है। उसे सीख कर वह पद्धति अपनानी चाहिये।


       हर छोटे बडे शिखर का नामकरण करते समय शायद हमें हर गाँव की बाबत पुराणकालीन संदर्भोका सहारा लेना पडेगा |  और फिर केवल इतना ही काफी नही है कि केवल नाम दिये गए हों और स्थानीय बुजुर्गों को वे याद हों। इनकी लिखित पहचान भी आवश्यक है। उदाहरण स्वरूप गाँव के शून्य मील वाले पत्थर पर या पोस्ट ऑफिस में यह भी लिखा जा सकता है कि इस गाँव के पर्वत शिखर का नाम अमुक है, इसकी गणन संख्या ये है, इसकी ऊँचाई इतनी है और पहाडी के मंदिर में ये देवता विराजते हैं।

ऐसी गिनती और नामकरण से ही हमारी धरोहर का जतन हो सकेगा और समृध्दि भी |
               =============




अभिभावक की डगर - 2 -- सच्चाई का संस्कार -चित्रप्रत parenting children -- hindi 2

अभिभावक की डगर 2
सच्चाई का संस्कार
published in Himalayan Oasis, Simla, issue 2
--लीना मेहेंदळे--
सच्चाई का संस्कार एक बहुत बडी बात होती है। जब मनुष्य ने बोलना सीखा तो वह पूरा प्रकटन इस लिये था कि दिल की बात, मन के विचार, जो अनुभूतियों के स्पंदनसे जागृत होते हैं उन्हें दूसरों तक पहुँचाया जाय, उनका संचरण हो। लेकिन धीरे धीरे मनुष्यने जाना कि बोलते बोलते झूठ भी बोला जा सकता है। उसके बाद ज्ञानी, ऋषि और तपास्वियों ने, जाना कि मनुष्यके व्यक्तिगत जीवन में और सामाजिक उत्थान में सत्य की क्या जरुरत है और झूठको क्यों नकारना है। इस प्रकार मानव विकास के इतिहास मे जब पहली बार 'बोलना' एक ज्ञान माध्यम के रुप मे आया तब 'बोलने' का अर्थ था 'सच बोलना' फिर जैसे जैसे सामाजिकता बढी, झूठ भी एक कला के रुप में उभरा। फिर सामाजिक नीति की बात आई तो फिर सच्चाई की दुहाई की आवश्यकता पडी।
      हमारे वेद पुराणों मे जो बार बार सत्य पर जोर दिखता है, वह क्योंकर ? सात घोर नरकों की तरह सात दिव्य लोक भी बताये गये है जिनमें सबसे ऊपर, सबसे श्रेष्ठ है सत्य लोक - जहाँ ईश्र्वर का वास माना गया है।
      एक वैदिक ऋचा है- सत्यं वद, धर्मं चर। यानी सच बोलो और धर्म निभाओ। हमारी प्रार्थना है- असतो मा सत्‌ गमय यानी मुझे असत्य की राह से हटाकर सच्चाई की राह पर ले चलो मांडूक्य उपनिषद कहता है - सत्यमेव जयते नानृतम्‌ यानी सचही जीतेगा झूठ कभी नही और ईशावास्योपनिषद् ने तो एक सुंदर कविता कह दी-
            हिरण्मयेन पात्रेन सत्यस्यापिहितम्‌ मुखम्‌।
            तत्वम्  पूषन्‌ अपावृणु, सत्यधर्माय दृष्टये।
यानी कि सच का मुहाना एक सोने के ढक्कन से ढका पडा है (लोग उस सोने से ही चौंधिया जाते हैं और सच्चाई को देखने की ललक खो बैठते हैं)। तो हे सूर्य, तुम अपनी तेजस्विता से उस सोनेके परदे को दूर करो ताकि मैं सत्य का दर्शन कर सकूँ।
      महाभारत की कथा ने सत्यका बखान ऐसा किया हैं - कि धर्मराज युधिष्ठिर चूँकि सदा सच बोलते थे, तो उनका रथ जमीन से चार अंगुल ऊपर चलता था। लेकिन जिस दिन युध्द भूमि में उसने यह दिया 'अश्र्वत्थामा हतः नरो ना कुंजरो वा', तो उस एक झूठसे उसने युध्द तो जीत लिया परन्तु उसका रथ भूमिपर वापस गया
      मुझे लगता है कि बच्चों को सत्यधर्म का संस्कार बिलकुल आरंभ से और बडी सजगता से देना पडता है। उन्हें समझाना आवश्यक होता है कि सच का अर्थ है तह तक पहुँचना सत्य एक ही हो सकता है और केंद्र बिंदु में वही रह सकता है झूठ छिछला होता है और हर परत के साथ उखडने लगता है। वह - मनुष्य को ज्ञान, विज्ञान या आविष्कार तक नही पहुँचा सकता। लेकिन अपने रोज के जीवन के उदाहरणों से यह बात बच्चों को कैसे समझाएँ? इसके
लिये आवश्यक है बच्चों को विश्र्वास हो कि मातापिता उन्हें झूठ नही बताएँगे सच्चाई बताने में एक साझेदारी का चिन्तन भी होता है। हम किसीसे सच कहते हैं तो अपने ज्ञानभंडार में उसे शामिल कर लेते हैं, उसकी हिस्सेदारी को कबूल कर लेते हैं। बच्चोंको यह लगना चाहिए कि मॉ बाप उन्हे साझेदार मानते हैं इसलिए सच ही बताएंगे। यह सच्चाई और साझेदारी का गणित भी उनके दिमाग में बैठाना पडता है।
      साथही बच्चों से बार बार नही पूछना चाहिये कि तुम झूठ तो नही बोल रहे? माँ बाप या स्कूल में भी अक्सर पूछ लिया जाता है। दूसरी ओर आँखे बंद कर बच्चों पर विश्र्वास कर लेना भी ठीक नही। क्योंकि हो सकता है उन्होंने बाहर किसी दोस्त से झूठ बोलने का रिवाज सीख
लिया हो। ऐसे में बच्चों के सामने जबतक बडों का अपना उदाहरण हो, आदर्श हों, तब तक उन पर संस्कार कैसे बने?
      हमारे बचपन में घर में हम तीन भाई बहन और माँ छुट्टी के समय अक्सर कॅरम, ताश, ल्यूडो, शतरंज आदि खेलते थे। कभी कभी पिताजी भी शामिल हो जाते थे। गर्मी की छुटियों मे आस पडोस और रिश्तेदारी के बच्चे भी जाते इस बहाने हम सबकी एक साथ बैठने की, दुख - सुख बाँटने की कवायत भी पूरी हो जाती झगडना और एक दूसरे को मनाना भी हो जाता। वह भी सहजीवन को बढावा ही देता है लेकिन अपने बच्चों के समय मैंने देख कि सबके अलग अलग रुटीन थे। फिर मैंने एक अभिनव तरीका अपनाया महिने मे कम से कम दो बार और जरूरत पडे तब तब हमने कॉन्फरंसिंग करने का नियम बनाया। सुबह ही जाहिर कर दिया जाता कि आज मैं इसकी जरूरत महसूस कर रहा हूँ या कर रही हूँ। अंदाजन समय भी तय हो जाता। एक घंटा इसके लिये निकालना अनिवार्य कर दिया था इसमें हर सदस्य चार प्रकार की बातें अवश्य करेंगे - पिछली बार के बाद अबतक किस बात ने बहुत खुशी दी, या दुखी किया, घर के कौनसे क्रिटीकल काम पिछड रहे हैं और निकट भविष्य में किन बातों पर अधिक ध्यान देना पडेगा। अक्सर मैं ही अनाऊंसमेंट करती थी यानी थोडासा काम का जिम्मा अधिक, लेकिन यह प्रक्रिया बडी उपयोगी साबित हुई।
      ऐसे मौके पर कई बार खुशी का उदाहरण देते हुए मैं किसीके सत्यवादिता की बात भी कह देती और यह भी कि उस व्यक्तिपर मुझे कितना गर्व महसूस हुआ - भले ही उसका मेरा परिचय हो मुझे याद आता है कि एक दिन हमने इस बात पर कॉन्फरंसिंग की थी कि उस दिन एक लडकी - बच्छेंद्री पाल - एवरेस्ट की चोटी पर चढी थी
      आज टी व्ही के जमाने इस तरह की कॉन्फरंसिंग का नियम बनाकर - आप देखें तो इसके अच्छ फायदे ही मिलेंगे। एक संस्कार यह भी शुरू हो जायगा।
--------------------------------------
१५, सुनीति, जगन्नाथ भोंसले मार्ग, मुंबई ४०००३२